श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक १० वा

पातालतलमारभ्य संकर्षणमुखानलः ।

दहन्नूर्ध्वशिखो विष्वग्वर्धते वायुनेरितः ॥१०॥

उष्णें तापलें पृथ्वीतळ । पोळलें शेषफणामंडळ ।

तैं सहस्त्रमुखें विषानळ । अग्निकल्लोळ वमिता झाला ॥६२॥

पाताळतळींहूनि देखा । ऊर्ध्वमुख अग्निशिखा ।

जाळीतचि तिहीं लोकां । उठिला भडका अनिवार ॥६३॥

क्षोभें दिधला फूत्कारा । सहस्त्रमुखें सुटला वारा ।

तो साह्य झाला त्या वैश्वानरा । जाळीत दिगंतरा वाढला वणवा ॥६४॥