श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ३ रा

कुलं वै शापनिर्दग्धं नङ्क्ष्यत्यन्योन्यविग्रहात् ।

समुद्रः सप्तमे ह्येतां पुरीं च प्लावयिष्यति ॥३॥

उरलें असे आमुचें कुळ । शापनिर्दग्ध केवळ ।

अन्योन्यविग्रहें सकळ । कलहमूळ नासेल ॥२०॥

भूमि मागोनि समुद्रापासीं । म्यां रचिलें द्वारकेसी ।

मज गेलिया निजधामासी । तो सातवे दिवसीं बुडवील ॥२१॥