श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ५ वा

न वस्तव्यं त्वयैवेह मया त्यक्ते महीतले ।

जनोऽधर्मरुचिर्भद्र भविष्यति कलौ युगे ॥५॥

म्यां सांडिलिया महीतळी । प्रबळ बळें वाढेल कळी ।

आजीच तूवां निघिजे तत्काळीं । जंव तो कळी नातळे ॥२६॥

कळी आतळेल जेव्हां । जनीं अधर्मु वाढेल तेव्हां ।

कुविद्येच्या उठती हांवा । सैंघ धांवा निंदेच्या ॥२७॥

न लभे स्वार्थाची कवडी । तरी करिती निंदेच्या कोडी ।

ऐसी कलियुगीं वस्ती कोडी । तूवां अर्ध घडी न रहावें ॥२८॥