श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक ४२ वा

ईक्षयाऽलकनन्दाया, विधूताशेषकल्मषः ।

वसानो वल्कलान्यङग, वन्यभुक् सुखनिस्पृहः ॥४२॥

करुनि अलकनंदेचें स्नान । करावें विध्युक्त तीर्थविधान ।

मग तेथें वसावें आपण । वसतें लक्षण तें ऐक ॥२१॥

त्यजूनि वस्त्रें आपण । करावीं वल्कलें परिधान ।

करुनि वनफलें भोजन । रहावें आपण अनुद्वेग ॥२२॥

आपुली पूर्ण निःस्पृहता । दावावी लोकसंग्रहार्था ।

निजसुखें तुज तेथें असतां । द्वंद्वसहिष्णुता दावावी ॥२३॥