श्रीएकनाथी भागवत

ज्ञानेश्वरीतील उणीव एकनाथी भागवताने भरून काढली.


श्लोक २२ वा

बन्धूनां नष्टगोत्राणामर्जुनः सांपरायिकम् ।

हतानां कारयामास, यथावदनुपूर्वशः ॥२२॥

यादव निमाले कुळवंशेंसीं । गोत्रज नाहीं कर्मांतरासी ।

वज्र राहिला द्वारकेसी । ते विधी अर्जुनासी करणें पडली ॥८४॥

’मी पावलों निष्कर्म ब्रह्म । तो मी न करीं अंत्येष्टीकर्म’ ।

ऐसा ज्ञानगर्वोपक्रम । तोही सूक्ष्म भ्रम अर्जुनीं नाहीं ॥८५॥

’कर्मण्यकर्म यः पश्येत्’ । हा अर्जुनास बाणला पूर्णदंश ।

तेणें तो अंत्येष्टीकर्मास । स्वयें सावकाश करिता जाहला ॥८६॥

प्रथम ज्येष्ठांचें दहन । पाठीं कनिष्ठांचे जाण ।

तैसेंचि करी पिंडदान । तिळतर्पण सर्वांचें ॥८७॥

उत्तरक्रिया करुनि संपूर्ण । द्वारकेसी आला अर्जुन ।

तेथेंही वर्तलें आने आन । समुद्र दारुण क्षोभला ॥८८॥