संत नामदेवांचे अभंग

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


संत नामदेवांचे अभंग - लाडाईचा अभंग

पूर्व संबंधें मज दिधलें बापानें । शेखी काय जाणें कैसे झालें ॥१॥
प्रसुतालागीं मज आणिलें कल्याणा । अंतरला राणा पंढरीचा ॥२॥
मुकुंदें मजशीं थोर केला गोवा । लोटियलें भवानदी माजी ॥३॥
ऐकिला वृत्तांत सर्व झालें गुप्त । माझेंचि संचित खोटें कैसें ॥४॥
द्वादशबहात्तरीं कृष्ण त्रयोदशी । आषाढ हें मासी देवद्वारीं ॥५॥
सर्वांनीं हा देह अर्पिला विठ्ठलीं । मज कां ठेविलें पापिणीसी वेगळी ॥६॥
लाडाई म्हणे देह अर्पीन विठ्ठला । म्हणोनी आदरिला प्राणायाम ॥७॥