महाभारत सत्य की मिथ्य?

महाभारताचा हिंदू धर्माशी सखोल संबंध आहे आणि आधुनिक हिंदूंवर आणि त्यांच्या सांस्कृतिक परंपरेवर त्याचा प्रचंड प्रभाव आहे. भारतातील बरेच लोक महाभारताला वास्तविक घटित घटनांची एक मालिका समजतात. काही भारतीय या अगम्य महाकाव्यातून घडलेल्या घटनांची इतिहासात नोंद केली आहे. हे महाकाव्य एक ऐतिहासिक लेख समजले जाते. महाभारत हे सत्य आहे की दंतकथा हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिला आहे. आपण याची पाळेमुळे खोदुन काढण्याचा, शोधण्याचा प्रयत्न केला की जाणवते की महाभारत प्राचीन भारतीय इतिहासाला लाभलेली समृद्ध आणि वास्तवदर्शी माहिती आहे. महाभारताच्या सत्यता आणि दंतकथा असण्यावर लिहिलेले लेख वाचल्यास प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे अश्या अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर येतील. त्या घटनांचा अभ्यास करत असताना आपल्याला बहुधा मतांची एक बाजू मिळेल अशीही समजेल ज्यालेखी महाभारतातील वास्तव ही वस्तुस्थिती नाही. या चर्चेअंती इतके तर सत्य आपल्याला कळेल की महाभारत हा भारताचा एक समृद्ध आणि ज्ञानाने ओतप्रोत भरलेला भारतीय इतिहास आहे यात शंका नाही.


उडणारी वाहने आणि आण्विक युद्ध

भारतीय महाकाव्य जसे कि महाभारत आणि रामायण यांमध्ये धर्म, शिक्षा, यांसोबत विनाश, विध्वंस, येऊ हि दाखवले गेले आहे.  जेव्हीज जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्ब च्या सहाय्य्यने हल्ला केला होता.  तेंव्हा त्या देह्सची सांस्कृतिक, धार्मिक, घसरण झाली होती, त्यांच्या पारंपारिक वास्तू जमीनदोस्त झाल्या होत्या. या अणुबॉम्ब मुले त्या शहराजवळकीत्येक वर्ष रेडिएशन विषबाधेचे परिणाम दिसून आले होते.

अश्याच आशयाचे तपशील महाभारतात हि दिले गेले आहेत. महाभारतातील अनेक तपशिलाचा ब्रिटिश अभ्यासकांनी त्यांच्या सोयी नुसार आणि संस्कृत भाषेच्या उथळ ज्ञानामुळे जे अर्थ निघाले तेच पुढे भारतातील राज्यभाषांमध्ये भाषांतरित केले गेले होते. त्यातल्याच ब्रिटिश इतिहासकारांनी भाषांतरित केलेल्या काही ओली खाली दिल्या आहेत. त्याचे मराठीत भाषांतर लिहिले आहे

ब्रिटिश व पाश्चत्य इतिहासकांरांच्या मते

“वेगवान आणि शक्तिशाली विमानाचे उड्डाण होताना विश्वातील सर्व शक्ती व ऊर्जा एकत्रित झाली असेल आणि त्यामुळे विमानाला एक दिशा मिळण्यासाठी मदत मिळाली असेल. या विमानाचे उड्डाण होताना एक प्रचंड मोठा धुराचा आणि उष्णतेचा स्तंभ तयार झाला असेल. हा स्तंभ डॅश सहस्त्र सूर्याच्या प्रकाश इतका प्रभावी आणि तेजस्वी असेल.  हे सर्व एक अज्ञात शास्त्र त्याकाळच्या भारतीय राजांना माहिती होते. हे एक शास्त्र होते लोहयुक्त, तोवर मेघगर्जना करणारे, जणू काही मृत्यूचा देवता आहे. क्षणार्धात त्या शस्त्राने समस्त परिसर राखेत विलीन होईल इतके अजस्त्र होते ते."

हि माहिती वाचली कि आपल्या समोर एक विमान येत असेल परंतु मला समोर एक क्षेपणास्त्र दिसते. त्याकाळचे आण्विक क्षेपणास्त्र. आज ज्याप्रमाणे कालौघात संगणकाचा आकार लहान झाला आहे तसेच कदाचित तेंव्हाचे क्षेपणास्त्र आजच्या शास्त्रांपेक्षा कित्येक पटीने मोठे असेल. पुढे इतिहासकार असे लिहितात कि,

"ते शस्त्र इतके शक्तिशाली होते कि त्याने अखंड वृषण आणि अंधकांची पिढीच्या पिढी मिटवली.  त्या शात्राच्या वापराने त्यांचे देह इतके जळाले होते कि कुणालाही

 ते मृतदेह ओळखीस येऊ शकत नव्हते. या आण्विक स्फोटानंतर भीषण दृश्य समोर होते. लोकांची नख आणि केस गाळून पडले होते, घरातील मातीच्या भांडी फुटली होती. पशु पक्षांचा रंग पंधरा झाला होता जणू काही त्यांच्या शरीरातून रक्तच नाहीसे झाले आहे. या स्फोटाच्या काही कालावधीनंतर तेथील रसद, धान्य, यांनाही विचित्र संसर्ग झाला होता.  या भीषण आगीपासून वाचण्यासाठी अनेक सैनिकांनी स्वतःला जवळच्या झोकून दिले."