महाभारत सत्य की मिथ्य?

महाभारताचा हिंदू धर्माशी सखोल संबंध आहे आणि आधुनिक हिंदूंवर आणि त्यांच्या सांस्कृतिक परंपरेवर त्याचा प्रचंड प्रभाव आहे. भारतातील बरेच लोक महाभारताला वास्तविक घटित घटनांची एक मालिका समजतात. काही भारतीय या अगम्य महाकाव्यातून घडलेल्या घटनांची इतिहासात नोंद केली आहे. हे महाकाव्य एक ऐतिहासिक लेख समजले जाते. महाभारत हे सत्य आहे की दंतकथा हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिला आहे. आपण याची पाळेमुळे खोदुन काढण्याचा, शोधण्याचा प्रयत्न केला की जाणवते की महाभारत प्राचीन भारतीय इतिहासाला लाभलेली समृद्ध आणि वास्तवदर्शी माहिती आहे. महाभारताच्या सत्यता आणि दंतकथा असण्यावर लिहिलेले लेख वाचल्यास प्रत्येक गोष्टीला पुरावा आहे अश्या अनेक घटना आपल्या डोळ्यासमोर येतील. त्या घटनांचा अभ्यास करत असताना आपल्याला बहुधा मतांची एक बाजू मिळेल अशीही समजेल ज्यालेखी महाभारतातील वास्तव ही वस्तुस्थिती नाही. या चर्चेअंती इतके तर सत्य आपल्याला कळेल की महाभारत हा भारताचा एक समृद्ध आणि ज्ञानाने ओतप्रोत भरलेला भारतीय इतिहास आहे यात शंका नाही.


किरणोत्सर्गी क्षेत्र

जोधपूरमध्ये कुरुक्षेत्राच्या युद्धापासून किमान ७००-कि.मी.च्या परिघामध्ये असलेल्या काही शहरात किरणोत्सर्गाचे अनेक पुरावे सापडतील.

ब्रम्हास्त्र जे अश्वत्थाम्याने उत्तरेच्या गर्भाकडे सोडले होते ते अर्जुनाने निकामी केले. परंतु निकामी करण्याच्या प्रक्रियेने इतका मोठा स्फोट घडला कि आजूबाजूच्या परिसरात त्याचे पडसाद उमटले. आज असे मिथक आहे कि  जोधापूर जवळच्या परिसरात कुरुक्षेत्रात वापरल्या गेलेल्या ब्रह्मास्त्रांचा इतका परिणाम झाला आहे कि, जन्माला येणारी अर्भके अधू किंवा व्यंग असलेली जन्माला येतात. 

महाभारताला खराखुरा इतिहास मिळावा यासाठी आता हे खूप संशोधन चालू आहे. महाभारताच्या सत्यता पडताळण्यासाठी  खूप तर्क लावले जात आहेत.