श्रीज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


अभंग २५

नामोच्चारांत जाणीव नेणीव लयास जाणें याचें नांव मोक्ष.

जाणीव नेणीव भगवंती नाहीं । उच्चारणी पाही मोक्ष सद्दा ॥१॥

जेथे कळिकाळाच रीव नही तोच नारायण हरि नामोच्चर

नारयण हरि उच्चार नामाचा । तेथें काळीकाळाचा रीघ नाहीं ॥२॥

सर्वव्यापी भगवंतंचे प्रमाण वेदांनांही कळले नाहे, मग तें जीव जंतुना कोठुन कळणार ?

तेथील प्रमाण नेणवे वेदाशीं । ते जीवजंतुसी केवि कळे ॥३॥

या अभ्यासाचें फळ नारायणापाठ असुन त्या योगानें ज्ञानेश्वर महा राजांनी सर्वत्र वैकुंठ केले.

ज्ञानदेवा फळ नारायणपाठ । सर्वत्र वैकुठ केले असें ॥४॥