दासबोध

दासबोध समर्थ रामदासांनी लिहिलेला ग्रंथ आहे. दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी,त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींकरवी लिहविला. रायगड जिल्ह्यातील शिवथरची घळ या घटनेची साक्ष देत आजही अत्यंत निबीड अरण्यात विसावलेली आहे. दासबोध हा ग्रंथ एकुण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत.एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनी सांसारिकांना,साधकांना,निस्पृहांना,विरक्तांना,सर्व सामान्यांना,बालकांना,प्रौढांना,जराजर्जरांना,सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना,मानवी मनाला उपदेश केलला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात. समर्थ रामदास स्वामींनी दसबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे...