गुरूचरित्र

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.


अध्याय तेरावा

बाळवर्य ज्ञानज्योति । कृष्णमाधवसरस्वती । सदानंदोपेंद्रयती । सातवा मी हे मुख्य शिष्य ॥१॥

अधूर्त सर्व शांत । गुरु ऐशां शिष्यांसहित । आले जन्मभूमीप्रत । हो माताही यतिवंद्या ॥२॥

विनन्ति करुनी नर । विश्वरुपा घरोघर । न्हेती देती गुरुवर । परपार मायबापां ॥३॥

तो प्रभू म्हणे भगिनीला । दंपतीभेद केला । त्वां लातिलें हो धेनूला । पती त्यजील कुष्ठी होसी ।

ते भूयः प्रार्थितां म्हणती । वृद्धत्वीं पति हो यति । कुष्ठाची करीन शांति । स्त्रियां पति गती न अन्य ।

असें तये वेळीं तिला । सांगोन शिष्यमेळा । घेवोनि ये गोदावरीला । भूगोला उद्धरी जो ॥६॥

शिष्य मेळवी आणिक । माधवारण्यसंज्ञक । ज्ञान देउनी सम्यक् । विशोक केला गुरुनें ॥७॥

गुरुवर्य पुढें येती । तेथ एका विप्रा पाहती । मराया ये गोदेप्रति । दगड पोटीं बांधोनिया ॥८॥

तयाचा तो जाणून भाव । शिष्यां म्हणती घ्यारे धांवा शिष्यें घेवोनिया धांव । तयास जवळ आणिला ।

तो साद्यंत पुसतां वदे । शूलपीडित मी प्राण दें । कुकर्मं केले पूर्वीं मदें । त्याचें फल दे देव हें की ।

नाहीं पुण्य पूर्वापार । मी झालों भूमीभार । गुरु म्हणती अनिवार । दोष फार आत्मघातें ॥११॥

तूं मरु नको रोगावर । औषध देतों मी शीघ्र । ऐसें म्हणती गुरुवर । तवं ये विप्र सायंदेव ॥१२॥

तो तोषवी श्रीरुसी । म्हणे द्विजमी कांचीवासी । गुरु म्हणती हा उपवासी । या द्विजासी जेवूं घालीं ।

हें साम्प्रत करी काज । सायंदेव म्हणे हा द्विज । अन्नवैरी झाला आज । दोष ये मज हा मरतां ॥१४॥

अपूप दे म्हणती तया । तें मानून गुरुराया । भिक्षेला ने प्रार्थुनियां । द्विज शिष्यांसमवेत ॥१५॥

धू पाद्ये गुरुचे पाद । पूजी विधीनें वंदी पाद । जेववी सर्वां हो सानंद । झाला विगद तोही विप्र ।

इति श्री०प०प०वा०स०वि०गु० सारे विप्रशूलहरणं नाम त्रयोदशो०