गुरूचरित्र

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.


अध्याय पंचविसावा

होते मंदधीब्राह्मण । म्लेच्छराजापुढें येऊन । सार्थवेद म्हणून । घेती धन उन्मत्त ते ॥१॥

म्लेच्छा मदोन्मत्त विप्र । म्हणती आज्ञा द्यावी क्षिप्र । वादें जिंकूं लोकीं विप्र । हारिपत्र किंवा घेवूं ॥२॥

राव महानंदे देत । आज्ञा बसवी पालखीत । विप्र राजे म्हणवीत । भूमी जिंकित येती तेथ ॥३॥

ते कुमसी मध्यें यती । त्रिविक्रमभारती । त्रिवेदी जाणुनियां येती । त्या म्हणती वाद करीं ॥४॥

जरी मैत्रद्विज असे । तरी करील कीं असें । कुबुद्धि हे विप्र जसे । हरती तसें करावें ॥५॥

यांची वांछा गुरु पुरवील । असें म्हणोनी त्यां तत्काळ । यती आणी गुरुजवळ । सांगे सकळत्रिविक्रम ॥६॥

वाद्यां शोधीत हे आले । यांणीं माझें न ऐकिलें । मग येथें आणिले । या शिक्षिले पाहिजेत ॥७॥

गुरुजी म्हणती तया । नेणो आम्ही जयाऽजया । वाद आम्हाम कासया । तुम्हीं वाया मरुं नका ॥८॥

विप्र वचन बोलती । तुम्हां काय विद्या येती । तें ऐकूनि गुरु म्हणती । गर्व किती करितां हा ॥९॥

गर्वे लोकीं किती मेले । बाण रावण खपले । व्यर्थ कौरवादी मेले । आरंभिलें काय हें तुम्हीं ॥१०॥

इति श्री०प०प०वा०स०वि० सारे उन्मत्तद्विजाख्यानं नाम पंचविशो०