गुरूचरित्र

गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. ह्या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्याय पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती होय.


अध्याय तिसावा

दत्ताधिष्ठित माहोर । तेथें गोपीनाथ विप्र । तया होउनी मेले पुत्र । दत्तवर वांचवी एक ॥१॥

ते निष्ठा दत्तावर । ठेउनी करिती संस्कार । त्याचा विवाह केला थोर । हर्षे सादर मायबापें ॥२॥

त्यां होय रुप समान । साजे जोडें देवासमान । पतिसेवेवांचून । सतीमन न विसंबे ॥३॥

सून महा पतिव्रता । तयां हर्ष हो पहातां । तंव आली दुर्दैवता । रोग सुता त्या हो असाध्य ॥४॥

होऊन क्षयरोग । क्षीण झालें पतिचें आंग । जेवीना तो तसी चांग । सती हो रोग नसतांही ॥५॥

हो पश्चात्ताप द्विजांला । व्यर्थ वरिली सुभगेला । म्हणे तुझा भोग सरला । माहेराला जांई सुखें ॥६॥

ती भयंकर वाचा । ऐकून म्हणे तुमचा । जेथ देह तेथ हा साचा । असे तुमचा अर्धात्मा हा ॥७॥

नसो वियोग म्हणून । सासुसासर्‍यां प्रार्थून । धवा घेऊन डोंळींतून । ये गाणगाभुवना ॥८॥

त्रिदोष वाढुनी जाण । द्विज झाला गतप्राण । सती उठे द्याया प्राण । निवारण करी जन ॥९॥

तीं तयाचे आठवी गूण । रडे शीर्ष आपटून । म्हणे रुसे गौरिरमण । कोण चोरुन ने सौभाग्या ॥१०॥

जैं धेनु जातां शरण । राखुनि घे यवन प्राण । भेटूं जातां देवा पडून । टाकीं चुरुन देऊळ कीं ॥११॥

तेणें अप्री झालें मज । देवा शरण येतां आज । न राखसी माझी लाज । देवा तुज कींव न ये कीं ॥१२॥

ती असे करी विलाप । तंव आला आपोआप । तो दीनाचा मायबाप । गुरु रुप पालटोन ॥१३॥

तीसि वदे कां रडसी । जीव ये कीं रडतां यासी । मायामय संबंधासी । व्यर्थ म्हणसी पति मेला ॥१४॥

देव तेही काळाधीन । तुम्ही तरी मर्त्य जाण । पाहूं जातां विचारुन । मेला कोण कोण जन्मला ॥१५॥

देह उत्पन्न होऊन । मरे त्याहुन विलक्षण । आत्मा निंत्य विकारहीन । संबंधी न कवणाचा तो ॥१६॥

त्या उत्क्रान्तीव्यापकाकैंची । वार्ता न त्या संबंधाची । नदीकाष्टवत्‌ हो देहांची । भेटी हेची कर्मयोगें ॥

ह्या अमंगळ देहाच्या । तादात्में भ्रम कर्मांचा । गुणमूल अज्ञानाचा । हो कीं साचाम परिणाम ॥

तूं अतंद्रित होऊन । दे हा संबंध सोडून । जेणें जासी उद्धरुन । तें साधून घेई शीघ्र ॥१९॥

रक्तास्थि मांसा न रडें । हें ऐकून ती पायां पडे । म्हणे बापा शोकीं पडे । काढा कडे सोयरे तुम्हीं ॥

इति श्री०प०प०वा०स०वि० सारे प्रेतांगनाशोको नाम त्रिंशो०